Gayatri S Muley
राधेलाच होत्या का फक्त विरहवेणा
तिलाच का होत्या फक्त सांजखुणा
उमटल्या कितीकच वेळा पाऊलखुणा.
पुसट होत गेल्या आत सगळ्या खुणा
भिजेल धरा कधी असेल श्रावण वेळा
बरसेल पुरा , होऊन घन आषाढ निळा
चिंब भिजून संपतील तप्त तप्त झळा
सरतील का उरतील या जीवाच्या कळा.
फुलतील कितीकदा अनवट गंधवेळा
वेणु नादे गुंजतील दिशा ,नी कातर वेळा
सारीपाट मांडलेला बघ परतुनी एक वेळा
अंत:घट अविरत प्यासे ये परतुनी घननीळा
.........गायत्री.....
August 17, 2014
राधेलाच होत्या का फक्त विरहवेणा
तिलाच का होत्या फक्त सांजखुणा
उमटल्या कितीकच वेळा पाऊलखुणा.
पुसट होत गेल्या आत सगळ्या खुणा
भिजेल धरा कधी असेल श्रावण वेळा
बरसेल पुरा , होऊन घन आषाढ निळा
चिंब भिजून संपतील तप्त तप्त झळा
सरतील का उरतील या जीवाच्या कळा.
फुलतील कितीकदा अनवट गंधवेळा
वेणु नादे गुंजतील दिशा ,नी कातर वेळा
सारीपाट मांडलेला बघ परतुनी एक वेळा
अंत:घट अविरत प्यासे ये परतुनी घननीळा
.........गायत्री.....
August 17, 2014
छान!
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete