Monday, June 22, 2015

निर्णय...

Gayatri S Muley
......
जिथे मार्ग खुंटतात.
तिथेच वळायच असत
जिथे रस्ते संपतात
तिथेच थांबायच असत.

मागे सुटलेले ठिकाण
 आपले कधिच नव्हते
परतुन पुन: तिथे
निवारा शोधायचा नसतो

तिथे असेलच वस्ती
नविन पाखरांची
घरटे असेल परके
तरी नाती विश्वासाची

पुन: तिथे पाऊलखुणा
उमटवायच्या नसतात
एकदा उखडले गेले मुळ
पुन: रुजवायची नसतात.

...गायत्री मुळे....

October 20, 2013 at 9:48pm ·
P

No comments:

Post a Comment