Thursday, June 25, 2015

जगताच आले नाही

वेड होऊन कधी फसवुन घेता आल नाही.
सरसरून कधी गाता आल नाही
एका रेषेत कस काय जाऊ शकत आयुष्य
कदाचीत कधी जगताच आल नाही

पण आपल्या कुठे सीमारेषा एक होत्या.?
तुला तुझे भावविश्व
मला माझे बंधन
कधी काय तोडता आले नसते का
पण दूर किनार्या च्या दोन टोकाला राहूनही एकमेकाना पहाताच आल नाही
कदाचीत कधी जगताच आल नाही.

काही सगळ्याच संध्याकाळी उदासवाण्या नसतात
आणि रात्री काही सगळ्याच डोळ्यात सरत नाहीत
पण स्वप्नामधे सुध्दा तुला थांबवून ठेवता आले नाही
कदचीत कधीच जगता आले नाही

सगळे शांत असते.तुझे बदलते रुतू
माझे अंदाजी मौसमी वारे
वादळच नेहमी पेलावे लागते असे नाही
कदाचीत कधी जगताच आले नाही

सगळे शब्द कुठे नेहमी तुझ्याचसाठी असतात
संवाद नेहमी कुठे व्यक्त असतो
.मनातल्या मनात कधी बोलताच आले नाही
कदाचीत कधी जगताच आले नाही.

.......गायत्री .........
May 4, 2014 

No comments:

Post a Comment