प्रत्येक मनाच्या तळाशी
गाळ बसलेलाच असतो
वर वर स्वच्छ दिसणारे पाणि
ढवळले की गढूळ होणारच असत
त्या गाळात हमखास असत
एक गाठोड आठवणींचे
तेंव्हा गोड असले तरी
गाळात रुतून कडवट झालेल्या
सुखाची चव नासवणार्या आठवणी
त्याला जंग ही लागत नाही
प्रत्येक वेळेस झळाळूनच येतात त्या
त्य गाळाशी बसला असतो एक हुंदका..
कधीच बाहेर न येऊ शकलेला
एक स्वप्न असत
जे चिरनिद्रे साठी थांबलेले असते
कारण त्याला ........
जन्मांतराची वेस घालून दिलेली असते ....
गाठोड बांधून फेकताना...
गाळ बसलेलाच असतो
वर वर स्वच्छ दिसणारे पाणि
ढवळले की गढूळ होणारच असत
त्या गाळात हमखास असत
एक गाठोड आठवणींचे
तेंव्हा गोड असले तरी
गाळात रुतून कडवट झालेल्या
सुखाची चव नासवणार्या आठवणी
त्याला जंग ही लागत नाही
प्रत्येक वेळेस झळाळूनच येतात त्या
त्य गाळाशी बसला असतो एक हुंदका..
कधीच बाहेर न येऊ शकलेला
एक स्वप्न असत
जे चिरनिद्रे साठी थांबलेले असते
कारण त्याला ........
जन्मांतराची वेस घालून दिलेली असते ....
गाठोड बांधून फेकताना...
आणि खळखळून फुटलले एक हसू
ते तर पार सगळ्यात खाली
त्या गाठोड्यातून निघून
गाळात रुतून बसलेले
एखादे वाढदिवासाचे
पिवळे पडलेले ग्रीटिंग
एखादे शब्द हरवलेले पत्र
आणि .........
पोकळी असलेले मन
त्या पोकळीतून निघालेले आयुष्य
हलके असते प्रेतासारखे....
म्हणून गाळात रुतून न बसता
तरंगत वर येत...
अलगद पोहून शेवटी
किनारा गाठत.....
किना-यावर वाळूत
मनोरे बांधायला लागत.
टिकून रहात
वादळ वारे उन पाऊस झेलत
मग एक निवांत क्षण
रुतून बसत परत त्या गाळात
प्रत्येक आयुष्याला
एक गाठोड का बांधाव लागत?
आणि ते मनाच्या तळात
का फेकून द्यावे लागतय?
प्रत्येक मनाच्या तळाला
एक गाळ का साचलेला असतो ?
...गायत्री
No comments:
Post a Comment