Thursday, June 25, 2015

Gayatri S Muley
तू उगाचच खंतावावे
असे बोल माझे खचितच नव्हते
उगा सोडून दे सगळे असेच
माझेच माझे मनोगत होते

कसली करावी रुजवात.
कोण खोटे कोण खरे होते
पुरावे मी देण्याआधी
सही शिक्या निशी दाखले होते

वादळ वारे वावटळ
कधीचेच कुठे थांबले होते
नको आता कसलेच उधाण
झुळुकेने भिरकावले होते

एकदा शांत जलाशयात मी
खडा टाकून पाहीले होते
डोह असावेच आत पण
मला तरंग गिळायला उठले होते
......गायत्री ....

May 8, 2014

No comments:

Post a Comment